Akola News: Farmers brigade to strike on onion issue in Mumbai 
अकोला

कांदा प्रश्नावर किसान ब्रिगेड धडकणार मुंबईत

मनोज भिवगडे

अकोला  ः केंद्र सरकारने दोन महिन्यांपूर्वी जीवनावश्यक वस्तूच्या यादीतून कांदा काढला. त्यामुळे शेतकऱ्यांवर होणाऱ्या अन्यायाला वाचा फोडण्यासाठी शेतकरी नेते प्रकाश पोहरे यांच्या नेतृत्वात २ ऑक्टोबरला किसान ब्रिगेड मुंबईत धडकणार आहे. तेथे राज्यपलांची भेट घेवून निवेदन देण्यात येणार असल्याची माहिती मंगळवारी पोहरे यांनी पत्रकार परिषदेत दिली.


कांद्याच्या दराबाबत कुठेही ओरड नसताना विदेशी व्यापार अधिनियमातील अधिकार वापरून केंद्र सरकारने निर्यात बंदी केली. दरवर्षी आयात-निर्यातीचे अधिकार बेदरकारपणे वापरून व कधी फुकटात वाटून शेतकऱ्यांच्या मालाचे बाजारभाव पाडम्याची क्रूर थट्टा सरकार करीत आहे. ही क्रूर थट्टा थांबविण्याची मागमी करण्यासाठी किसान ब्रिगेड २ ऑक्टोबरला अकोला येथून दांडीयत्रा काढणार आहे.

नाशिक मार्गे राज्यभरातील किसान ब्रिगेडचे कार्यकर्ते ३ ऑक्टोबरला मुंबई येथे पोहोचतील. तेथून राज्यपालांना निवेदन देण्यासाठी जाणार असल्याची माहिती पोहरे यांनी दिली. त्यानंतर मुंबईतच मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, कृषिमंत्री, ऊर्जा मंत्री यांची भेट घेवून राज्य सरकारच्या अखत्यारित येणाऱ्या समस्यांचे व शेतमालविषयी चर्चा करणार असल्याचेते म्हणाले.

यात्रेत सहभागी होणाऱ्या शेतकरी २ ऑक्टोबरला अकोला येथे डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठात एकत्र येऊन नाशिककडे कुच करतील. या दांडीयात्रेत शेतकऱ्यांनी सहभागी होण्याचे आवाहन यावेळी पोहरे यांनी केले.

(संपादन - विवेक मेतकर)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Vijay Hazare Trophy: सूर्यकुमार-शिवम दुबेही मुंबईसाठी खेळणार की नाही? महत्त्वाचे अपडेट्स आले समोर

Latest Marathi News Live Update : भारतातील अमेरिकन दूतावासाचे ट्विट व्हायरल

Bangladesh Hindu Youth Murder Reason : बांगलादेशातील हिंदू तरूणाच्या निर्घृण हत्येमागचे खरे कारण अखेर आले समोर!

Mumbai: राज्यात दोनच विमानतळांना प्रेरणादायी नावे, पण कोणत्या? अहवालातून महत्त्वाची माहिती समोर

Mumbai Water Supply: मुंबईत २२ ते २६ डिसेंबरपर्यंत पाणी संकट! 'या' भागांसाठी बीएमसीकडून महत्त्वाचा इशारा जारी, वाचा यादी...

SCROLL FOR NEXT